इंडस टॉवर : भविष्याचा सिग्नल आशादायक   

भाग्यश्री पटवर्धन 

इंडस टॉवर कंपनी भारती समूहाने ही कंपनी विकत घेतलेली असल्याने भविष्यात उत्तम कामगिरी होईल यात शंका नाही. आता जरी बक्षीस भाग देण्याचा निर्णय टाळला असला तरी समितीच्या अहवालानंतर पुढील तिमाही निकालावेळी काही निर्णय अपेक्षित आहेत.
 
शेअर बाजारातील अस्थिरतेची धूळ आता खाली बसायला लागली असे दिसत असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम हल्ल्यावरून तणाव निर्माण झाला आणि युद्धाचे ढग येणार अशी स्थिती निर्माण झाली. बाजाराला सतत काही ना काही धक्के खाण्याची आणि देण्याची सवय असते. आगामी काळात भारताकडून कशी आणि कधी कारवाई होते यावर भविष्यातील धक्का अवलंबून आहे. असे असले तरी तो धक्का बाजाराला खाली खेचत असेल, तर गुंतवणूकदाराला संधी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर भारती एअरटेल या दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगाचे एक अंग असलेली दूरसंचार मनोरे उभारणार इंडस टॉवर गेल्या आठवड्यात चर्चेत आली. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली आणि तीत बक्षीस भाग आणि लाभांश याबाबत निर्णय अपेक्षित होता; मात्र तो टाळण्यात आला. बक्षीस भागाची शक्यता असल्याची बातमी आल्यापासून या शेअरने वरची दिशा दाखवण्यास सुरुवात केली होती. तसे झाले असते तर चार लाख छोट्या गुंतवणूकदारांना प्रथमच परतावा मिळाला असता.  
 
कंपनीने मागील आठवड्यात शेअर बाजाराला माहिती देताना जे पर्याय नमूद केले, त्यात शेअर फेरखरेदी, बक्षीस भाग, लाभांश, कर्ज रोखे याचा उल्लेख होता; मात्र कोणताच निर्णय झाला नाही आणि कंपनीने योग्य पर्याय निवडण्यासाठी एक अंतर्गत मूल्यांकन समिती नियुक्त केली आहे. मुळात भारती समूहाने ही कंपनी विकत घेतलेली असल्याने भविष्यात उत्तम कामगिरी होईल यात शंका नाही. आता जरी बक्षीस भाग देण्याचा निर्णय टाळला असला तरी समितीच्या अहवालानंतर पुढील तिमाही निकालावेळी काही निर्णय अपेक्षित आहेत. कंपनीने २०२४ मध्ये शेअर फेरखरेदी केली होती. या कंपनीची स्थापना २०१६ मध्ये झालेली आहे. फेरखरेदीवेळी ४६५ रुपये भाव होता. सध्याची भावपातळी कमाल किमान भाव (५२-ुज्ञ हळसह ४६०.३५५२-ुज्ञ श्रेु २९२.००) अशी आहे. शेअर ४०६ रुपयाच्या घरात आहे. देशातील मोबाइल ग्राहक संख्या आणि त्यानुसार लागणारे मनोरे हे गुणोत्तर पाहता मनोर्‍यांची आवश्यकता कायम राहणार आहे. तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलामुळे मात्र भविष्यात मनोरे तंत्र कालबाह्य ठरण्याचा धोका आहे. असे असले तरी इंडसचे प्रवर्तक मित्तल असल्याने आगामी काही वर्षे चांगली वाटचाल राहील. कंपनीने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले. त्यानुसार नफ्यात चार टक्के घट झाली आहे. महसुली उत्पन्न मात्र सात टक्के वाढून ७७२७ कोटी रुपये झाले आहे. गेल्या महिन्याभरात हा शेअर १५ टक्के वाढला होता. भारती समूहातील कंपनी असल्याने कामगिरी आश्वासक राहील यात शंका नाही.       

संरक्षण क्षेत्र आणि संधी

संरक्षण क्षेत्राशी संबंधित वर उल्लेख केलेल्या काही कंपन्यांचे शेअर गेल्या आठवड्यात वाढण्याचे मुख्य कारण भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे भविष्यकाळात या कंपन्यांच्या उत्पादनांना होणारी वाढती मागणी हे असू शकते. दोन-तीन महिन्यांपूर्वी बाजारात जेव्हा घसरण सातत्याने होत होती, त्यावेळी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपन्यांमध्ये थोडीफार गुंतवणूक केली त्यांना खरेदी आणि आतच भाव यातील फरक लगेच लक्षात येत असेल. वर उल्लेख केलेल्या शेतीची यादी निवडक आहे. संरक्षण कल्पनेवर आधारलेला डिफेन्स फंड कसा वाढला हे आपण याआधी एका लेखात पाहिल्याचे आठवत असेल. एचडीएफसीने तो आणला होता सध्या त्याचे नक्त मालमत्ता मूल्य म्हणजे एनएव्ही २० रुपयाच्या घरात आहे. पुण्यातील भारत फोर्ज ही त्यापैकी एक आहे. परकी वित्तसंस्था हळूहळू पुन्हा बाजारात परतू लागल्या आहेत. भारताकडून कारवाई झाल्याच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास बाजारात थोडीफार घसरण अपेक्षित आहे.

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

 

Related Articles